{tocify} $title={Table of Contents}
दिव्यांगत्वावर मात करित अजय व अमोल ने मिळविले यश | Success story of Ajay and Amol
माणूस हा समाजातून शिकत असतो.शिक्षणामुळे मनुष्य प्रगती करू शकतो. प्रत्येकाला मुलभुत हक्क दिलेले आहे. त्यापैकी शिक्षण हे एक आहे. दिव्यांग विदयार्थीना ही कायद्याने शिक्षण देणे गरजेचे आहे . शिक्षण हक्क कायद्यान्वये दिव्यांगाना देखील शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे.
प्रत्येकाच्या जीवनात सुख- दु:ख येत असतात. यावर मात करून जीवनात कस उभं रहावं लागतं. यासाठी अंबड तालुक्यातील गोविदपूर तांडा येथील सुभाष गंगाधरराव पवार यांना दोन मुले झाले. दोघाना जन्मत: कर्णबधरित्व आले आहे.पण आई -वडील निराश न होता सामान्य मुलाप्रमाणे आपले मुल शिकल पाहिजे, अशी आशा बाळगली.व त्यांनी दिव्यांगत्वार मात केली.
गृहभेट
सन २०११ मध्ये प्रथम नियुक्तीनंतर कामाची रूपरेषा समजून घेतली. सुभाष गंगाधरराव पवार यांची प्रथम गृहभेट घेतली. या भेटीत प्रथम पालकांना दिव्यांगत्वाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पालकांनी सगितले की, माझे मुल सामान्य मुलाप्रमाणे शिकतील का, मुलं ही माझ्याप्रमाणे शेतीच करतील. पालकांना सगितले की,
प्रत्येक कर्णबधीर मुलांना थोडी फार उर्वरीत ऐकण्याची क्षमता असते. याच क्षमतेला विकसित केले पाहिजे. विदयार्थीना श्रवणयंत्राच्या मदतीने स्पीच थेरपी देउन शब्दाचे उच्चारण करून घेता येते, जास्तीत जास्त ऐकण्यावर भर देणे. जगातील व भारतातील दिव्यांग क्षेत्रात कार्य केलेल्या हेलन केलर ,लुई ब्रेलस, अल्बर्ट आयसटाईन, सुधाचंद्रन, रविद्र जैन,अरूणीमा सिन्हा, शेखर नाईक, दिव्यांग व्यक्तीचे कार्य सांगितले. त्यांनी दिव्यांगत्वार मात करून नवीन प्रेरणा जगासमोर ठेवली. प्रत्येक मुलं शिकू शकतं. मुलांनी स्वत:च्या पायावर उभे राहवे .पालकांनी आपल्या मुलांना बोलत करण्यासाठी प्रत्यन करावे अशी इच्छा व्यक्त केली.